सोपी व छोटी भाषणे
शिवाजी महाराज
अध्यक्ष महाशय
व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हास महाराष्ट्राचा जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगत आहे.
शिवाजी महाराजांचा
जन्म शिवनेरी किल्ल्यावर १६३० मध्ये झाला. त्यांनी आदिलशहा, निजामशहा, मोगलशहा यांच्या शवरुद्ध अनेक लढाया केल्या.
त्यांच्या दरबारात सर्व जाती
धर्मांची निष्ठावान माणसे होती.
त्यांच्या
अंगी अनेक चांगले गुण होते. त्यांनी स्वराज्य स्थापन केले व सर्व जनता सुखी केली.
अशा थोर महापुरुषाला
माझे कोटी कोटी सलाम.
एवढे बोलून
मी माझे भाषण संपवतो/ते..
जय हिंद...!
जय महाराष्ट्र....!
राजमाता जिजाबाई
अध्यक्ष महाशय
व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हास राजमाता जिजाबाई यांच्या
बद्दल चार शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत ही नम्र विनंती.
‘जिच्या हाती
पाळण्याची दोरी,
ती राष्ट्राचा
उद्धार करी.’
जिजाबाई यांनी
शिवरायांना घडवले, त्यामुळे त्यांच्या हातून स्वराज्य निर्मितीचे पवित्र कार्य घडले. सर्व जनता सुखी झाली, मराठ्यांचे स्वतंत्र राज्य तयार
झाले. माता कशी
असावी याचा आदर्श जिजाबाईंनी निर्माण केला आहे.
जिजाबाईंना
माझे कोटी कोटी सलाम.
एवढे बोलून
मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
लोकमान्य टिळक
अध्यक्ष महाशय
व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हास लोकमान्य टिळक यांच्या
विषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत
ही नम्र विनंती.
त्यांचा जन्म
२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गांगाधर
टिळक असे होते. भारताला इंग्रजांच्या ताब्यातनू मुक्त करण्यासाठी ते आयुष्यभर
झटले. 'स्वराज्य हा
माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’ अशी त्यांनी घोषणा केली. त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले .शेविीशेवटी
भारत देश स्वतंत्र झाला.
एवढे बोलून
मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
प्रबोधनपर
अध्यक्ष महाशय
व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हास चार शब्द सांगणार आहे,ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत ही नम्र विनंती.
ज्ञान हा
माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते. शिक्षणाला फार महत्त्व आहे.म्हणून तर म्हणतात ‘शिकाल
तर टिकाल’.
मुला - मुलीत भेदभाव करू नका. मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सोडू
नका. कारण ‘मुला पेक्षा मुलगी बरी,प्रकाश देते दोन्ही घरी’ गर्भलिंग परीक्षण करू नका. मुलींची
सांख्या कमी झाली आहे. त्यामुळे
सरकारने ‘लेक वाचवा’ अभियान सुरु केले आहे.
सर्वांनी
शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे.जातीभेद मानला नाही पाहिजे. आपण सर्वजण आनंदाने सुखाने राहूयात.
एवढे बोलून
मी माझे भाषण संपवतो/ते.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
आपला राष्ट्रध्वज
अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हास आपल्या राष्ट्रध्वजाविषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत ही नम्र विनंती.
आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे.म्हणजेच त्यामध्ये तीन रांग आहेत. सर्वात वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा व सर्वात खाली हिरवा रांग आहे. मध्यभागी पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रांगाचे अशोक चक्र आहे. त्या २४ आरे आहेत. केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. पांढरा रांग शांततेचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे.
ध्वज फडकताच आपण सर्वजण ध्वजाला सलामी देऊन मान राखतो.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो/ते.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
सावित्रीबाई फुले
अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत ही नम्र विनंती.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. स्त्री प्रथम शिकली पाहिजे. पुरुषाप्रमाणे तिलाही न्याय्य हक्क मिळाले पाहिजेत. त्याशिवाय हा समाज सुधारणार नाही. हे त्यांनी मनोमन जाणले होते. त्यासाठी त्यांनी प्रथम स्वतः शिक्षण घेतले व नंतर मुलींसाठी पुण्यात शाळा सुरु केली. त्यात त्यांना अपमान, शिव्या- शाप सोसावे लागले. प्रसांगी चिखल, शेण यांचा अंगावर मारा सोसावा लागला. पण त्यांनी माघार घेतली नाही. म्हणूनच आहे सर्व क्षेत्रात स्त्रिया-मुली चमकत आहेत. स्त्री जातीवर सावित्रीबाई यांचे अनांत उपकार आहेत. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम...!
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो/ते.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आांबेडकर यांच्या विषयी चार शब्द सांगणार आहे,ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत ही नम्र विनंती त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी हरीजनांच्या उद्धारासाठी अविरत कष्ट केले. भारतीय राज्यघटनेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना भारतरत्न हा किताब देण्यात आला.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो/ते.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
महात्मा ज्योतिबा फुले
अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत ही नम्र विनंती.
ज्योतिबा फुले हे थोर समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८५१ मध्ये मुलींसाठी शाळा काढली. आपली पत्नी सावित्रीबाई हिला शिकवून शिक्षिका बनविले. कष्टकरी लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे त्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. म्हणून शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी समाजातील स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव दूर करण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. अशा या महान समाज सुधारकाचा २७ नोव्हेंबर १८७९ रोजी मृत्यू झाला.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो/ते.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
१५ ऑगस्ट/स्वातंत्र दिन
अध्यक्ष महाशय
व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला १५
ऑगस्ट/स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकूण घ्यावेत
ही नम्र
विनंती.
आपला भारत
देश इंग्रजांच्या ताब्यात होता. दीडशे वर्षे आपल्या देशावर इांग्रजांची
गुलामगिरी होती. त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले. यात भारतीय लोकांचे अतोनात
हाल झाले. या त्रासातून
मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. महात्मा गांधी, सुभाषचांद्र
बोस, लोकमान्य टिळक, पंडीत नेहरू, नाना पाटील, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाल लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक
वीरांनी जीवाची पर्वा केली नाही. सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. आपला भारत देश १५ऑगस्ट
१९४७ रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून
साजरा करतो.
एवढे बोलून
मी माझे भाषण संपवतो/ते.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!
लेक वाचवा, देश वाचवा
“लेक वाचवा,
देश वाचवा”, “स्त्री जन्माचे स्वागत करूया” अशा घोषणा आपल्याला
वारंवार ऐकायला मिळतात. कारण आजच्या समाजामध्ये मुलगी पोटात वाढतेय म्हटलं की
मुलीला पोटातच मारतात.
किती हा मुलीवर
अन्याय करतात!
मुलींनाही
जगण्याचा हक्क आहे, त्यांना जगू द्या.पोटातील ते छोटसं
बाळ सुद्धा म्हणत असल
की आई, मला जगायचंय, मला पण हे जग बघायचंय, मला जन्माला
येऊ दे ना.
फक्त मुलगाच
वंशाचा दिवा असू शकतो का? नाही.
मुलीसुद्धा
आपल्या आईवडीलांचा आधार बनतात, मुलींचाही गौरव केला पाहिजे,म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मुलीला मारू नका. त्यांना जन्माला घाला
व वाढवा. मी सुद्धा
एक मुलगीच आहे याचा मला अभिमान वाटतो.
एवढे बोलून
मी माझे भाषण संपवते.
जय हिंद....!
जय महाराष्ट्र.....!